वसंत तावडे यांनी मराठी साहित्याची सेवा मनापासून केली-सुभाष देसाई
मुंबई- साहित्यसेवक वसंत तावडे हे एक अजब रसायन होते.त्यांचा प्रत्येक कामात आग्रह,शिस्त, चौकट होती.मेहनत करणे हा त्यांच्या स्थायी स्वभाव होता.त्यांनी मराठी साहित्याची सेवा मनापासून केली.मेहनत करणे हा त्यांच्या स्थायी स्वभाव होता.प्रबोधन संस्थेच्या उभारणीत त्यांच्या मोठा वाटा होता अश्या शब्दात शिवसेनेचे नेते व प्रबोधन गोरेगावचे संस्थापक सुभाष देसाई यांनी काल रात्री गोरेगावात वसंत तावडे यांच्या कार्याचा गौरव केला. सुभाष देसाई पुढे म्हणाले की, आज वाचन आणि लेखनाचा संबंध तुटला तो या स्पर्धेने खोटा ठरवला. प्रबोधन गोरेगावने साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती प्रबोधन मार्मिक कथास्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सुभाष देसाई बोलत होते.यावेळी मंचकावर जेष्ठ पत्रकार संजीव साबडे ,मार्मिकचे संपादक मुकेश माचकर,शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर,विनोदी लेखक सॅबी परेरा,प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितीन शिंदे,सल्लागार प्रा. बापू नाडकर्णी,संस्थेचे प्रमुख कार्यवाह गोविंद गावडे, कोषाध्यक्ष रमेश इस्वलकर आदी मान्यवर उपस्थित होते. इतिहासाचे अभ्यासक, लेखक व प्रख्यात वक्ते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी सुमारे दीड तास ...